पट्टागड "विश्रामगड"
नाव पट्टागड उंची प्रकार गिरीदुर्ग चढाईची श्रेणी सोपा ठिकाण नगर, महाराष्ट्र जवळचे गाव पाचपट्टा डोंगररांग कळसुबाईची रांग सध्याची अवस्था पट्टागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गड नगर-नाशिक जिल्ह्य़ांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील पट्ट्याचीवाडी जवळ आहे. ]इतिहास सन १६७९मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. सोनेनाणे, जडजवाहिर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. दरम्यान, महाराज सोनेनाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनिती निश्चित करण्यात आली. निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २१ नोव्हेंबर इ.स. १६७९ या दिवशी नगर-नाशिक जिल्ह्य़ांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नामांतर नंतर ‘विश्रामगड’ असे पडले
No comments:
Post a Comment